आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

आधुनिक भारताचा इतिहास PDF डाउनलोड करा

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स

सर्व विषयाच्या नोट्स PDF डाउनलोड करा

सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

आधुनिक भारताचा इतिहास PDF डाउनलोड करा, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, टिळक व गांधी युग भारतीय राष्ट्रीय सभा. Modern History Of India Notes PDF

समाजामध्ये ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे प्राचीन कालखंडाचा अंत व मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात मानली जाते. तद्वतच ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाहीवर आधारित समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तिथे मध्ययुगीन कालखंडाचा अंत व आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते. अर्थात, समाजव्यवस्थेतील बदल एका रात्रीतून घडत नाहीत. म्हणूनच दोन कालखंडांच्या बदलाचा काळ हा दोन्ही कालखंडांतील वैशिष्टय़ांनी युक्त असतो. भारताच्या संदर्भात आधुनिक कालखंडाच्या उदयाचा काळ वरील निकषानुसार ठरवणे कठीण आहे.
इतिहासकारांमध्ये भारतीय आधुनिक कालखंडाच्या उदयासंदर्भात मतभेद असले तरी ब्रिटिश सत्तेच्या बंगालमधील स्थापनेपासून नेहरू युगाच्या अस्तापर्यंतच्या काळाचा अंतर्भाव या कालखंडात होतो. अर्थात, ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेसाठी आवश्यक पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या उत्तर मुघल काळाचा या संदर्भातील अभ्यास आवश्यक ठरतो. आधुनिक इतिहासाची विभागणी चार भागांमध्ये करता येईल- ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा काळ (१७५७-१८५७); भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा काळ (१८५७-१८८५); भारतीय राष्ट्रीय चळवळीचा काळ (१८८५-१९४७); नेहरू युग (१९४७-१९६४). नेहरू युगाची चर्चा आपण या लेखमालेच्या ‘भारताचे स्वातंत्र्योत्तर दृढीकरण’ या लेखात करू या.
ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रवास एका व्यापारी संघटनेपासून व्यापारी-लष्करी- राजकीय संघटनेपर्यंत होतो. अस्थिर राजकीय परिस्थितीचे कारण दर्शवत कंपनीने लष्करी स्वरूप प्राप्त केले. बंगालमधील कंपनीचा राजकीय हस्तक्षेप व दस्तकांचा (Free Passes) गरवापर यातून प्लासी व बक्सारचा संघर्ष उभा राहतो. प्लासीची लढाई कंपनीला बंगालच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक बनवते, तर बक्सारच्या लढाईतून कंपनी उत्तर भारतातील एक महत्त्वाची सत्ता होते. या लढायांतून कंपनीचे मनोबल उंचावते. यांचा अभ्यास केवळ लढाई म्हणून न करता त्यांचा व्यापक संदर्भ लक्षात घेऊन होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करावा लागतो.

१. युरोपियन कंपन्यांचे आगमन

भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या युरोपियन सत्तांचा क्रम खालीलप्रमाणे आहे:

  1. पोर्तुगीज (१४९८): वास्को-द-गामा कालीकत बंदरात उतरला.
  2. डच (१६०२): मसुलीपट्टणम येथे पहिली वखार.
  3. इंग्रज (१६०८): सुरत येथे पहिली वखार (थॉमस रो).
  4. फ्रेंच (१६६४): सुरत येथे पहिली वखार.

२. ब्रिटिश सत्तेची स्थापना (महत्त्वाच्या लढाया)

इंग्रजांनी भारतात आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रामुख्याने दोन मोठ्या लढाया जिंकल्या:

  • प्लासीची लढाई (२३ जून १७५७): रॉबर्ट क्लाईव्ह आणि बंगालचा नवाब सिराज-उद-दौला यांच्यात. यामुळे ब्रिटिशांचा बंगालमध्ये शिरकाव झाला.
  • बक्झरची लढाई (२२ ऑक्टोबर १७६४): इंग्रज विरुद्ध मीर कासीम, शुजा-उद-दौला आणि शाह आलम II. या विजयामुळे इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओरिसाचे ‘दिवाणी’ अधिकार मिळाले.

३. १८५७ चा उठाव

हा भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम मानला जातो.

  • तात्कालिक कारण: एनफिल्ड रायफलच्या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावल्याची अफवा.
  • प्रमुख नेतृत्व:
    • झाशी: राणी लक्ष्मीबाई
    • कानपूर: नानासाहेब पेशवे, तात्या टोपे
    • बिहार: कुंवर सिंग
    • दिल्ली: बहादूरशहा जफर
  • परिणाम: ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली आणि भारताचा कारभार ब्रिटीश पार्लमेंटकडे (राणीचा जाहीरनामा १८५८) गेला.

४. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५)

  • स्थापना: २८ डिसेंबर १८८५ (मुंबई, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय).
  • पुढाकार: ए. ओ. ह्यूम (निवृत्त इंग्रज अधिकारी).
  • पहिले अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी.
  • कालखंड:
    1. मवाळ कालखंड (१८८५-१९०५): नामदार गोखले, फिरोजशहा मेहता. (सनदशीर मार्गावर विश्वास).
    2. जहाल कालखंड (१९०५-१९२०): लाल-बाल-पाल (टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल). स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री.

५. गांधी युग (१९२०-१९४७)

महात्मा गांधींच्या आगमनानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले.

वर्षआंदोलन / घटनामुख्य उद्दिष्ट
१९२०असहकार आंदोलनसरकारी शाळा, न्यायालये व पदव्यांचा त्याग.
१९३०सविनय कायदेभंगमिठाचा सत्याग्रह (दांडी यात्रा).
१९४२छोडो भारत आंदोलन‘करो या मरो’ मंत्र, ब्रिटिशांना भारत सोडण्याचे आवाहन.

Export to Sheets


६. महत्त्वाचे गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय

  • लॉर्ड विल्यम बेंटिक: सती प्रथा बंदी (१८२९).
  • लॉर्ड डलहौसी: खालसा धोरण, रेल्वेची सुरुवात (१८५३).
  • लॉर्ड रिपन: स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक.
  • लॉर्ड कर्झन: बंगालची फाळणी (१९०५).
  • लॉर्ड माउंटबॅटन: भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय.

७. समाजसुधारक आणि संस्था

परीक्षेसाठी समाजसुधारकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते:

  • राजा राममोहन रॉय: ब्राह्मो समाज (आधुनिक भारताचे जनक).
  • महात्मा जोतिराव फुले: सत्यशोधक समाज (शेतकरी आणि स्त्री शिक्षणाचे कार्य).
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर: बहिष्कृत हितकारिणी सभा, महाडचा सत्याग्रह, भारतीय संविधान निर्मिती.
  • स्वामी दयानंद सरस्वती: आर्य समाज (‘वेदांकडे चला’ हा संदेश).

१. ब्रिटीश काळातील महत्त्वाचे कायदे (Constitutional Development)

ब्रिटीशांनी भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी कायदे केले, जे भारतीय संविधानाचा पाया ठरले:

  • रेग्युलेटिंग ॲक्ट (१७७३): बंगालच्या गव्हर्नरला ‘गव्हर्नर जनरल’ पद देण्यात आले (वॉरण हेस्टिंग्ज पहिला).
  • चार्टर ॲक्ट (१८३३): बंगालचा गव्हर्नर जनरल आता ‘भारताचा गव्हर्नर जनरल’ बनला (लॉर्ड विल्यम बेंटिक).
  • १८५८ चा कायदा: कंपनीची सत्ता संपून सत्ता ब्रिटीश राजा/राणीकडे गेली. ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ (भारत मंत्री) हे पद निर्माण झाले.
  • मोर्ले-मिंटो सुधारणा (१९०९): मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती (फोडा आणि राज्य करा नीती).
  • माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा (१९१९): प्रांतांमध्ये ‘द्विदल शासन पद्धती’ (Dyarchy) लागू केली.
  • भारत सरकार कायदा (१९३५): केंद्रात द्विदल शासन, प्रांतीय स्वायत्तता आणि ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ची स्थापना.

२. क्रांतिकारक चळवळ (Revolutionary Movement)

केवळ अहिंसक मार्गच नाही, तर सशस्त्र क्रांतीनेही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला:

  • अभिनव भारत (१९०४): स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापना केली.
  • अनुशील समिती: बंगालमधील महत्त्वाची क्रांतिकारक संघटना.
  • हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA): चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी दिल्लीत स्थापना केली.
  • गदर पार्टी (१९१३): लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत (सॅन फ्रान्सिस्को) स्थापना केली.
  • आझाद हिंद सेना: रासबिहारी बोस यांनी स्थापना केली आणि सुभाषचंद्र बोस यांनी तिचे नेतृत्व करून ‘चलो दिल्ली’ची हाक दिली.

३. महत्त्वाच्या घटना आणि करार (Timeline Points)

  • लखनौ करार (१९१६): मवाळ आणि जहाल यांच्यात समेट झाला, तसेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात सहकार्य करार झाला.
  • जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९): जनरल डायरने बैसाखीच्या दिवशी शांततापूर्ण सभेवर गोळीबार केला. याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी आपली ‘सर’ (Knighthead) पदवी परत केली.
  • स्वराज्य पक्ष (१९२३): चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी कायदेमंडळात प्रवेश करण्यासाठी स्थापन केला.
  • सायमन कमिशन (१९२७): एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे याला प्रचंड विरोध झाला (‘सायमन गो बॅक’).
  • पुणे करार (१९३२): महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला, ज्यामुळे दलितांसाठी राखीव जागा निश्चित झाल्या.

४. वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक (जोड्या लावा साठी महत्त्वाचे)

वृत्तपत्रसंपादक / संस्थापक
बेंगॉल गॅझेट (पहिले वृत्तपत्र)जेम्स ऑगस्टस हिकी
केसरी व मराठालोकमान्य टिळक
मुकनायक व बहिष्कृत भारतडॉ. बाबासाहेब आंबेडकर
यंग इंडिया व नवजीवनमहात्मा गांधी
सुधारकगोपाळ गणेश आगरकर
मिरत-उल-अखबारराजा राममोहन रॉय

५. भारतातील सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी

  • सत्यशोधक समाज (१८७३): महात्मा फुले यांनी दीन-दलितांच्या आणि स्त्रियांच्या हक्कासाठी स्थापन केला. त्यांचे ‘गुलामगिरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
  • प्रार्थना समाज: आत्माराम पांडुरंग आणि न्या. म. गो. रानडे.
  • रामकृष्ण मिशन: स्वामी विवेकानंद यांनी मानवाच्या सेवेसाठी स्थापना केली.
  • थिऑसॉफिकल सोसायटी: ॲनी बेझंट यांनी याचे कार्य भारतात वाढवले.

६. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने

  1. १८८५ (मुंबई): पहिले अधिवेशन (अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी).
  2. १९०७ (सुरत): काँग्रेसमध्ये फूट पडली (मवाळ आणि जहाल गट वेगळे झाले).
  3. १९१७ (कलकत्ता): पहिल्या महिला अध्यक्षा – ॲनी बेझंट.
  4. १९२४ (बेळगाव): महात्मा गांधी केवळ याच एका अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
  5. १९२५ (कानपूर): पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा – सरोजिनी नायडू.
  6. १९२९ (लाहोर): ‘पूर्ण स्वराज्या’चा ठराव संमत झाला (अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू).
  7. १९३६ (फैजपूर): ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन (अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू).

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा


ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या पहिल्या भागाला ‘बंगालमधील कंपनीच्या सत्तेचे दृढीकरण’ या दृष्टीने पहावे लागते. रॉबर्ट क्लाईव्ह, वॉरन हेिस्टग्ज व कॉर्नवालिस यांनी बंगालला एक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. रॉबर्ट क्लाईव्हच्या काळातील दुहेरी राज्यव्यवस्था (सत्ता व जबाबदारी यामधील घटस्फोट), या व्यवस्थेचे दुष्परिणाम व कंपनी प्रशासनातील केलेले बदल यांचा अभ्यास करावा लागतो. वॉरन हेिस्टग्जचे महसूल प्रशासनातील प्रयोग व त्याचे दुष्परिणाम, न्यायव्यवस्थेतील सुधारणा हे घटक महत्त्वाचे ठरतात. कॉर्नवॉलिसच्या अनेक सुधारणा, विशेषत: त्याचा न्यायव्यवस्थाविषयक कोड, महसूल प्रशासनातील कायमधारा पद्धत यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. या तिघांचा काळ कंपनीच्या बंगालमधील प्रशासकीय व्यवस्थेची उत्क्रांती दर्शवतो. अर्थात, ही व्यवस्था एक वसाहतवादी व्यवस्था आहे ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
कंपनीच्या सत्तेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बदललेले संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे.

आधुनिक भारताचा इतिहास PDF डाउनलोड करा

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

युरोपमध्ये नेपोलियनचा झंझावात व फ्रेंचांचे नव्याने निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता कंपनीला भारतीय वसाहत सुरक्षित करणे क्रमप्राप्त होते. परंतु यासंदर्भातील ब्रिटिश दृष्टिकोन लक्षणीय ठरतो. या दृष्टिकोनामध्ये केवळ आहे त्या वसाहतींचे संरक्षण करण्यापलीकडे जाऊन संपूर्ण भारतावर वर्चस्व निर्माण करून फ्रेंचांचा भारतप्रवेशसुद्धा कठीण करण्याची रणनीती आढळते. यासाठी नेपोलियन व फ्रेंच रणनीतीची जाण असलेल्या वेलेस्लीला गव्हर्नर म्हणून नियुक्त केले जाते. वेलेस्लीने तनाती फौजेच्या कराराचे उपयोजन करून संपूर्ण भारतावर कंपनीची ‘लष्करी अधिसत्ता’ प्रस्थापित केली. लॉर्ड हेिस्टग्जने याच लष्करी अधिसत्तेचे रूपांतर ‘राजकीय सार्वभौमत्वामध्ये’ केले व कंपनीला भारतीय उपखंडावर अधिराज्य गाजविणाऱ्या सर्वात मोठय़ा अधिसत्तेमध्ये रूपांतरित केले.


कंपनी सत्तेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुलनेने अधिक शांतता व स्थर्य जाणवते.

म्हणूनच या काळात बेंटींकच्या काळातील सामाजिक सुधारणा, आधुनिक शिक्षणाची (मेकॉले कमिटी) सुरुवात व प्रशासनातील सुधारणा या बाबी महत्त्वाच्या ठरतात. यानंतर डलहौसीचा काळ महत्त्वाचा ठरतो तो त्याच्या वसाहतवादी महत्त्वाकांक्षेमुळे व त्याने घडवून आणलेल्या आधुनिकीकरणामुळे. डलहौसी हा शुद्ध विस्तारवादी व खालसावादी होता. अनेक कारणे (दत्तक नामंजूर, खंडणी देण्यातील अपयश, गरकारभार इ.) पुढे करून किंवा शेवटी युद्ध करून भारतीय संस्थाने खालसा करणे हा त्याचा उद्देश होता. यातून डलहौसी काही प्रमाणात १८५७ च्या उठावास कारणीभूत ठरतो. डलहौसी प्रशासनाची दुसरी बाजू म्हणजे आधुनिकीकरण. रेल्वे, टेलिग्राफ, रस्ते, कालवे, बंदरे अशा पायाभूत सुविधा व लष्कर, प्रशासन, शिक्षणातील सुधारणा यांचा यात अंतर्भाव होतो. अर्थात, हे आधुनिकीकरण वसाहतवादाने प्रेरित होते, वसाहतवादाच्या दृढीकरणासाठी होते यात शंका नाही. आधुनिकीकरणातून डलहौसीने १८५७ चा उठाव दाबण्यासाठीचा भक्कम पाया घातला हे मान्यच करावे लागते. २०१३ च्या मुख्य परिक्षेतील प्रश्न – ‘In many ways, Lord Dalhousie was the founder of modern India.

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

Elaborate’- वरील विश्लेषणाची अपेक्षा ठेवतो.
१८५७ चा उठाव वैशिष्टय़पूर्ण होता. या उठावाच्या स्वरूपाबाबत अनेक मतमतांतरे आहेत. केवळ शिपायांचे बंड (युरोपियन मत) या मतापासून भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध (सावरकरांसारखे जहाल राष्ट्रवादी) या मतापर्यंत वैविध्य आढळते. या उठावाचे नेमके स्वरूप, उठावाची कारणे, उठाव फसण्याची कारणे व उठावाचा परिणाम यांचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे. या उठावाची राजकीय, सामाजिक, आíथक, धार्मिक, लष्करी स्वरूपाची अनेक कारणे असून ती कंपनी सत्तेच्या १०० वर्षांच्या कालखंडात शोधावी लागतात. या उठावाने कंपनी सत्ता संपुष्टात आणली व ब्रिटिश संसदेच्या हाती सत्तांतर झाले. ब्रिटिशांच्या दृष्टीने भारतीय सामंतशाहीचे आव्हान संपते व आधुनिक शिक्षणाने शिक्षित बुद्धिवादी मध्यमवर्गाचे राष्ट्रीय विचाराने प्रेरित असे नवे आव्हान
उभे राहते.
यापुढील महत्त्वाचा काळ म्हणजे ‘भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा काळ’. १८५७ च्या उठावातील नवजात भारतीय राष्ट्रवाद १८५८ ते १८८५ या काळात वाढतो.

१८८५ ला स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून अभिव्यक्त होऊ लागतो.

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

लॉर्ड लेटन व लॉर्ड रिपन यांचा काळ वेगवेगळ्या प्रकारे भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीस कारणीभूत ठरतो.

लेटनची अन्यायकारक धोरणे, भारतीय मताकडे केलेले पूर्ण दुर्लक्ष व त्याचा अपमान यातून ‘निर्मित प्रतिक्रियेमधून’ भारतीय राष्ट्रवाद वाढतो. लेटनचा काळ भारतीयांसाठी अपमानकारक, कठीण व वाईट असला तरी त्यातून भारतीय राष्ट्रवादाला बळ प्राप्त झाले यात शंका नाही (Boon in Disguise). लॉर्ड रिपनचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे वेगळा होता. तो ‘भारत मिशन’ने प्रेरित होऊन भारतामध्ये आला. त्याने लेटनची अनेक अन्यायकारक धोरणे रद्द केली. रिपनने अनेक चांगल्या धोरणांची आखणी केली. शिक्षण, महसूल प्रशासन, प्रसारमाध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था, न्यायव्यवस्था (Ilbert Bill Controversy) या संदर्भातील रिपनने केलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्याची धोरणे यशस्वी ठरली की नाही यापेक्षा त्याच्या प्रयत्नांनी भारतीय आशाआकांक्षा पल्लवित झाल्या व भारतामध्ये राजकीय जीवनाची सुरुवात झाली हे महत्त्वाचे ठरते. लॉर्ड कर्झनचा काळ लेटन व डलहौसीच्या काळाशी साधम्र्य साधतो. त्याच्या वसाहतवादी दृष्टिकोनाने त्याच्याच उद्देशाच्या विपरीत परिणाम होताना दिसतो. उत्क्रांत होणाऱ्या भारतीय राष्ट्रवादाला संपवण्याच्या प्रयत्नांमुळे कर्झनने बंगालमधील राष्ट्रवाद भारतीय राष्ट्रवादाचे मूळ मानून बंगालच्या फाळणीद्वारे भेदण्याचा प्रयत्न केला.

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा


यातून भारतीय राष्ट्रवाद प्रबळ होऊन ब्रिटिश सत्तेसमोर जहाल राष्ट्रवादाचे


नवे आव्हान निर्माण झाले. याव्यतिरिक्त कर्झनने शासनाच्या अनेक विभागांमध्ये केलेल्या सुधारणांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
या लेखात १७५७ ते १८८५ या कालखंडातील मुख्य धाग्याचा आढावा आपण घेतला. अर्थात, याचा संदर्भग्रंथातून केलेला सखोल अभ्यास महत्त्वाचा ठरतो. रूपरेखा समजावून घेतल्यानंतर केलेला संदर्भग्रंथांचा अभ्यास अधिक फायदेशीर ठरतो. पुढील लेखात या काळातील इतर धागे व भारतीय राष्ट्रीय चळवळ यांचा आढावा घेऊ या.

 इतिहास पुस्तक यादी
NO.BOOK NAMELINKAUTHOR/PUBLICATIONMRPOFFER
01Lokseva Maharashtratil SamajsudharakBuy NowBy Thormate Patil  320275
02
India’s Struggle for Independence: 1857-1947
Buy NowBy Bipin chndra399238
03A Brief History of Modern India – 2020-21Buy NowBy Rajiv Ahir 445299
04Bhartiya Swatantrya Chalvalicha ItihasBuy NowBy  Jaysingrao Pawar696365
05मध्ययुगीन भारतBuy NowBy satish Chandra379240
06Maharashtratil Rajkiya Samajik Chalwalicha ItihasBuy NowBy Anil Kathare589420
07Adhunik Maharashtracha Itihas / आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास Buy NowBy Anil Kathare500359
08Dr. Anil Kathare Maharashtracha Samgra ItihasBuy NowBy Anil Kathare500449
09Adunik Bharatacha Itihasa / आधुनिक भारताचा इतिहास Buy NowBy Ranjan kolambe450280
10Ancient India – Prachin Bharat (Marathi)Buy NowBy R S Sharma240210
11Bhartiya Swatantrya Chalvalicha Itihas भारतीय स्वतंत्र्य चळवळीचा इतिहासBuy NowBy  Jaysingrao Pawar375360
12Prachin Bhartacha Itihas प्राचीन भारताचा इतिहासBuy NowBy Samadha Mahajan160110
आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

आधुनिक भारताचा इतिहास नोट्स

One thought on “आधुनिक भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *