पाचवी पंचवार्षिक योजना

पाचवी पंचवार्षिक योजना

पाचवी पंचवार्षिक योजना

पाचव्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये

कालावधी – १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९ परंतु ; ही योजना १९७४ ते १९७८ या कालावधीसाठीच राबवण्यात आली.

अध्यक्ष – इंदिरा गांधी

उपाध्यक्ष – दुर्गाप्रसाद धर

प्रतिमान – अलन मन आणि अशोक रुद्र यांच्या खुले सातत्य या प्रतीमानावर आधारित डी. डी. धर यांनी योजना तयार केली होती.

मुख्य भर – दारिद्र्य निर्मुलन आणि स्वावलंबन

उद्दिष्ट्ये – आर्थिक वाढीचा दर ४.४%, दारिद्र्य निर्मुलन, उत्पादक रोजगारात वाढ

प्रकल्प –

  • किमान गरजांचा कार्यक्रम – १. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना मोफत व अनुदानित सेवा २. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढविणे.

विशेष घटनाक्रम –

  • २ ऑक्टोबर १९७५ – पहिल्या पाच प्रादेशिक बँका स्थापन
  • २ ऑक्टोबर १९७५-७६ – एकात्मिक बाल विकास योजना (ICDS)
  • १५ ऑगस्ट १९७६ – भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर
  • १९७७ – Housing Development Finance Corporation (HDFC) – हसमुखभाई पारेख यांच्या प्रयत्नाने स्थापन
  • १९७६-७७ – दुसऱ्यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल
  • २ ऑक्टोबर १९७८ -राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम (National Adult Education Programme)
  • १७७-७८ – वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)
  • १५ ऑगस्ट १९७९ – स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण (TRYSEM)

आर्थिक वाढीचा दर –

  • संकल्पित दर – ४.४%
  • साध्य दर – ४.७%
  • मंद औद्योगिक वाढ – औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक सरासरी दर ५.३% इतकाच राहिला.
  • अन्नधान्य उत्पादन, लागवडीखालील जमीन व सिंचन क्षेत्रात वाढ झाली.
  • सतत चलनवाढ होत राहिली. १९५१ ते २०१७ या संपूर्ण कालावधीत सर्वाधिक चलनवाढीचा दर १९७४-७५ मध्ये (सुमारे २५.२%) नोंदवला गेला. त्यामुळे १९७४-७५ हे वर्ष सर्वाधिक तेजीचे वर्ष म्हणून ओळखले जाते.

योजना काळातील राजकीय घडामोडी –

  • १८ मे १९७४ – पोखरण येथे पहिली अनुचाचणी. ‘आणि बुद्ध हसला’ या संकेतिक शब्दांनी ही अणुचाचणी ओळखली जाते. या चाचणीचे अभियान प्रमुख राजारामन्ना हे होते.
  • २६ एप्रिल १९७५ – सिक्किमचे भारतात विलीनीकरण होऊन त्यास राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • २५ जुन १९७५ – देशात तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर.
  • २६ जून १९७५ – २० कलमी कार्यक्रमास सुरुवात
  • मार्च १९७७ – जनता पक्षाचे सरकार आले.
  • १ एप्रिल १९७७ – Mini constitution म्हणून ओळखली जाणारी ४२ वी घटनादुरुस्ती लागू करण्यात आली.
  • १ एप्रिल १९७८ – पाचवी योजना संपुष्टात आणून जनता सरकारने स्वतः ची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली.
  • जानेवारी १९८० – कॉंग्रेस (आय) पुन्हे सत्तेवर आली. सरकती योजना फेटाळून १ एप्रिल १९८० ला नवीन सहावी योजना सुरु केली.
सरकती योजना वाचा .http://www.officersonlineacademy.com/2020/05/28/सरकती-योजना-साखळी-योजना-Rolling-plan

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *