चौथी पंचवार्षिक योजना
चौथी पंचवार्षिक योजना
चौथ्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये
कालावधी – १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष – इंदिरा गांधी
उपाध्यक्ष – धनंजय गाडगीळ (मे १९७१ पर्यंत), सी. सुब्रमण्यम (मे १९७१ ते जुलै १९७२), दुर्गाप्रसाद धर (जुलै १९७२ ते मार्च 1974)
प्रतिमान – अलन एस. मान व अशोक रुद्र यांच्या खुले सातत्य प्रतीमानावर आधारित . धनंजय गाडगीळ यांनी तयार केले.
मुख्य भर – स्वावलंबन
उद्दिष्टे – स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ , समतोल प्रादेशिक विकास
दुसरे नाव – गाडगीळ योजना
घोषवाक्य – स्थैर्यासह आर्थिक वाढ
घोषणा – गरिबी हटाओ
प्रकल्प –
- १९७२ – बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने)
- १९७३ – अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (DPAP)
- २४ जानेवारी १९७३ – Steel Authority of India Limited (SAIL) ची स्थापना. SAIL ची ८६% इक्विटी भारत शासनाच्या मालकीची असून तिला महारत्न चा दर्जा दिलेला आहे.
- १९७४-७५ – लघु शेतकरी विकास अभिकरण (SFDA)
विशेष घटनाक्रम –
- जुन १९६९ – MRTP कायदा, १९६९ संमत – आर्थिक शक्तींचे केंद्रीकरण व उद्योगातील मक्तेदारी टाळण्यासाठी
- १९ जुलै १९६९ -न १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
- १९६९ – अग्रणी बँक योजना (शिफारस – गाडगीळ अभ्यासगट, रचना – एफ. एस. नरीमन समिती)
- १९७० – Operation Flood चा पहिला टप्पा डॉ. वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आला.
- २२ नोव्हेंबर १९७२ – भारतीय साधारण विमा निगम (GIC- Government Insurance Corporation of India)
- १९७२-७३ – पहिल्यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल राहिला.
- १ जानेवारी १९७४ – FERA कायदा लागू करण्यात आला – परकीय व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी.
- १९७३-७४ – पहिल्यांदाच नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कालारीच्या स्वरुपात करण्यास प्रारंभ केला.
योजना यशस्वी न होण्याची कारणे –
- शेवटच्या तीन वर्षात योजनेस अपयश आले.
- १९७१ – भारत-पाक युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न
- १९७३ – पहिला तेलाचा झटका- तेलाच्या जागतिक किमती ४००% नी वाढल्या
आर्थिक वाढीचा दर –
- संकल्पित दर – ५.७ %
- साध्य दर – ३.२ %
- महागाईचा निर्देशांक १६५.४ वरून १९७३-७४ मध्ये २८४ इतका वाढला.
- या योजनेत ८% वार्षिक औद्योगिक वृद्धीदर गाठणे अपेक्षित होते, जो प्रत्यक्षात फक्त २.५% इतका गाठता आला.
योजना काळातील राजकीय घडामोडी –
- ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ – भारत-पाक युद्ध (बांगलादेश निर्मिती)
- १९७१ – मणिपूर, त्रिपुर, मेघालय या केंद्रशासित प्रदेशांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. मिझोरम व अरुणाचल प्रदेश हे नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.
- २५ जानेवारी १९७१ – हिमाचल प्रदेश ला राज्याचा दर्जा देण्यात आला.
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now