चौथी पंचवार्षिक योजना

चौथी पंचवार्षिक योजना

चौथी पंचवार्षिक योजना

चौथ्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये

कालावधी – १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४

अध्यक्ष – इंदिरा गांधी

उपाध्यक्ष – धनंजय गाडगीळ (मे १९७१ पर्यंत), सी. सुब्रमण्यम (मे १९७१ ते जुलै १९७२), दुर्गाप्रसाद धर (जुलै १९७२ ते मार्च 1974)

प्रतिमान – अलन एस. मान व अशोक रुद्र यांच्या खुले सातत्य प्रतीमानावर आधारित . धनंजय गाडगीळ यांनी तयार केले.

मुख्य भर – स्वावलंबन

उद्दिष्टे – स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ , समतोल प्रादेशिक विकास

दुसरे नाव – गाडगीळ योजना

घोषवाक्य – स्थैर्यासह आर्थिक वाढ

घोषणा – गरिबी हटाओ

प्रकल्प –

  • १९७२ – बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने)
  • १९७३ – अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (DPAP)
  • २४ जानेवारी १९७३ – Steel Authority of India Limited (SAIL) ची स्थापना. SAIL ची ८६% इक्विटी भारत शासनाच्या मालकीची असून तिला महारत्न चा दर्जा दिलेला आहे.
  • १९७४-७५ – लघु शेतकरी विकास अभिकरण (SFDA)

विशेष घटनाक्रम –

  • जुन १९६९ – MRTP कायदा, १९६९ संमत – आर्थिक शक्तींचे केंद्रीकरण व उद्योगातील मक्तेदारी टाळण्यासाठी
  • १९ जुलै १९६९ -न १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • १९६९ – अग्रणी बँक योजना (शिफारस – गाडगीळ अभ्यासगट, रचना – एफ. एस. नरीमन समिती)
  • १९७० – Operation Flood चा पहिला टप्पा डॉ. वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आला.
  • २२ नोव्हेंबर १९७२ – भारतीय साधारण विमा निगम (GIC- Government Insurance Corporation of India)
  • १९७२-७३ – पहिल्यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल राहिला.
  • १ जानेवारी १९७४ – FERA कायदा लागू करण्यात आला – परकीय व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी.
  • १९७३-७४ – पहिल्यांदाच नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कालारीच्या स्वरुपात करण्यास प्रारंभ केला.

योजना यशस्वी न होण्याची कारणे –

  • शेवटच्या तीन वर्षात योजनेस अपयश आले.
  • १९७१ – भारत-पाक युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न
  • १९७३ – पहिला तेलाचा झटका- तेलाच्या जागतिक किमती ४००% नी वाढल्या

आर्थिक वाढीचा दर –

  • संकल्पित दर – ५.७ %
  • साध्य दर – ३.२ %
  • महागाईचा निर्देशांक १६५.४ वरून १९७३-७४ मध्ये २८४ इतका वाढला.
  • या योजनेत ८% वार्षिक औद्योगिक वृद्धीदर गाठणे अपेक्षित होते, जो प्रत्यक्षात फक्त २.५% इतका गाठता आला.

योजना काळातील राजकीय घडामोडी –

  • ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ – भारत-पाक युद्ध (बांगलादेश निर्मिती)
  • १९७१ – मणिपूर, त्रिपुर, मेघालय या केंद्रशासित प्रदेशांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. मिझोरम व अरुणाचल प्रदेश हे नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.
  • २५ जानेवारी १९७१ – हिमाचल प्रदेश ला राज्याचा दर्जा देण्यात आला.
पाचवी पंचवार्षिक योजना वाचा. http://www.officersonlineacademy.com/2020/05/28/पाचवी-पंचवार्षिक-योजना/

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *